Manoj Jarange: कचाकच सह्या करा! मनोज जरांगे पाटील असे का म्हणाले? VIDEO

Uday Samant Urged By Jarange To Sign Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकत "कचाकच सह्या करा" अशी मागणी केली. आंदोलनात प्राण गमावलेल्या कुटुंबांना शासकीय सेवेत नोकऱ्या द्याव्यात अशीही त्यांची आग्रही भूमिका होती.
Summary

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर दबाव वाढला.

आरक्षणाच्या मागणीवर तातडीने सह्या करण्याची मागणी.

प्राण गमावलेल्या आंदोलकांच्या मुलांना शासकीय नोकऱ्यांची मागणी.

उदय सामंत यांना एमआयडीसीमध्ये नोकऱ्या देण्याची सूचना.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अखेर सरकारला नतमस्तक केलेच. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू होता. राज्यामध्ये 30 पेक्षा अधिक मराठा क्रांति मोर्चा निघाले होते. तर मनोज जरांगे यांनी मागच्या दोन वर्षांपासून हा लढा सुरू ठेवला होता. या लढाईत अनेकांनी आपले प्राण दिले. अनेक महिलांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले. त्यामुळे त्यांच्या मुलांना शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. आज त्याची मागणी करत असताना त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना विनंती केली की त्या लोकांना एमआयडीसीमध्ये लाऊन द्यावे आणि लगेच कचाकच सह्या करा अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com