Devendra Fadnavis On Rahul Gandhi: महाराष्ट्रात झालं तेच बिहारमध्ये होणार, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल|VIDEO

Rahul Gandhi Defaming India Abroad: देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्रात जे घडलं तेच आता बिहारमध्ये होणार आहे.

लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशातील काही भागात व्होट चोरीचा आरोप करत आहे तर पत्रकार परिषद घेत पीपीटी दाखवत निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच बिहार येथील प्रचार यात्रे दरम्यान देखील त्यांनी महाराष्ट्रात व्होट चोरी झाल्याचा मुद्दा लावून धरला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

काही लोकांचं अजून समाधान झाले नाहीये. तोंडावर पडले, थोबाडावर पडले तरी देखील हे सुधारले नाही. रोज उठून व्होट चोरीचा आरोप करत आहे, चोरी काही झाले असेल तर यांचे डोक चोरी झाले आहे तसेच आधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करायचे आणि आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहे. पण यांना परदेशात यांना कोणी विचारले नाही आणि बिहारमध्ये यांना कोणी विचारणार नाहीये. त्यामुळे यांची जी परिस्थिति महाराष्ट्रात झाली आहे तिच परिस्थिति बिहारमध्ये होणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com