महाराष्ट्राचे खासदार संसदेत कांद्याच्या भावावर केंद्र सरकारला घेरले.
शेतकऱ्यांना किमान ५५० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची मागणी.
गुजरात सरकारच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेत नाही, असा आरोप.
भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे यांसह अनेक खासदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.
मागच्या अनेक दिवसांपासून कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकार समोर येत होते. तसेच दिवसेदिवस घसरणारे भाव, उत्पादकाना किमान पाचशे रुपये प्रतिक्विंटल अनुदानासह निर्यातदारांना सवलत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवनात आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. गळ्यात कांद्याच्या माळा घालत जोरदारी घोषणाबाजी करत कांदा उत्पादकांचा आवाज बुलंद केला.
काल संसद भवन परिसरात खासदारांनी कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारला चांगलेच घेरले होते. गुजरात सरकार कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल तीनशे रुपये अनुदान देत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गळचेपी होत असून महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची कोंडी करत असल्याचा आरोप या खासदारांनी केला. यावेळी खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे आणि इतर खासदार उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.