महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात येत्या 21 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सारकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचा किनाऱ्याला थेट धोका नसला तरी यामुळे समुद्र हा खवळू शकतो.
22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळण्याची शक्यता आहे. तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. हि अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.