लाडकी बहीण योजनेवरुन पुन्हा एकदा श्रेयवाद पेटला आहे.लाडकी बहीण योजनेचे श्रेय फक्त एकनाथ शिंदेंनाच आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी त्याचं श्रेय घेऊ नये. लाडक्या बहिणींनाही हे सर्व माहित आहे, असं वक्तव्य भरत गोगवलेंनी केलं आहे. पुण्यातल्या एका सभेत भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु झाली होती. या योजनेचं सर्व श्रेय एकनाथ शिंदेंना जातं, असं शिंदे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
जो मुख्यमंत्री असतो त्याचे श्रेय असते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांच्याशी बोलून मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीचा विषय समजून घेतला. एकनाथ शिंदे स्वतः मध्य प्रदेश मध्ये गेले होते. त्यामुळे श्रेय कोणी घेऊ नये.. अजित पवार हे एवढ्या वर्षे सत्तेत होते. देवेंद्र फडणवीस ही पाच वर्ष सत्तेत होते. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी योजना का राबवली नाही. लाडक्या बहिणींना लाडकी बहीण हे श्रेय एकनाथ शिंदें यांचं आहे.जो मुख्यमंत्री असतो तो योजना राबवत असतो. अजित दादांनी श्रेय घेऊ नये.. लाडक्या बहिणींना ही माहिती आहे, असं भरत गोगवले म्हटले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.