कर्जत तालुक्यातील हालीवली गावातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. गावातील स्मशानभूमीत जादूटोणा व अघोरी विधी करत असलेल्या दोन संशयितांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडून चोप दिला, आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गावकरी रात्री स्मशानाजवळून जात असताना त्यांना संशयास्पद हालचाली जाणवल्या. आवाज ऐकून काही लोकांनी एकत्र येऊन स्मशानात धाव घेतली आणि तिथे काय चाललं होतं हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दोन इसम तिथे अघोरी साहित्य घेऊन विधी करत होते. त्यांच्या जवळ नारळ, लिंबू, काळे कोंबडे, राख, काही देवी-देवतांचे फोटो, आणि काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी किंवा कोणी धनदौलत मिळवण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. गावकऱ्यांनी दोघांना पकडून झाडाला बांधलं आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून या दोघांना त्यांच्या हवाली करण्यात आलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.