विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात या आश्वासनाला सरकारने पायदळी तुडवल्याचे दिसले. यावरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
क्या हुआ तेरा वादा असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. आपल्या एक्स अकाउंटवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था करून ठेवली कुठून भरती कर्ज आणि कुठून आणणार पैसा तुम्हीच आश्वासने दिली. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार म्हणून. शेवटी जनता म्हणते दादा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.