पावसाळ्याने जोर धरताच जायकवाडी धरण भरुन वाहत आहे. धरणात सध्या ६३ टक्के पाणिसाठा असून केवळ २४ तासांतच ६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक परिसरातून गोदावरी नदीच्या प्रवाहात आलेल्या पाण्यामुळे धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.गोदावरी खोऱ्यातील पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असून, ही स्थिती शेतकरी आणि नागरिकांसाठी आश्वासक ठरत आहे.
मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला जलसाठा भरू लागला असून, यामुळे खरीप हंगामासाठीची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.