जळगाव जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावल व जळगाव तालुक्यातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर व फरदड कापसाचे नुकसान झाले आहे. तर कोरडवाहू जमिनीवरील पिकांना मात्र फायदा झाला आहे.
हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन, थंडीही कमी झाली होती. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस सुरू झाला. काही भागांत गारपिटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावली. यावल शहर व तालुक्यातील बामणोद, आमोदा, न्हावी या भागांत गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर व फरदड कापसाचे नुकसान झाल्याने शेतकरी आता चिंतातुर झाले आहेत. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.