मुंबईतील तब्बल 95 टक्के नागरिक हे लोकलने प्रवास करतात. परंतु अनेक लोक हे विनातिकीट प्रवास करतात आणि त्यात काहीजण हे पकडले जातात. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन स्कीम लॉंच केली आहे. मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लकी यात्रा योजना सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांना तिकीट घेण्याची उत्सुकता निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार असून यामध्ये दररोज तिकीट धारकाला 10,000 हजार रुपये दिले जातील आणि आठवड्याच्या निवडलेल्या विजेत्याला 50,000 रुपये देण्यात येणार असल्याचे सीएसआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.