अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आज पाच वाजता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला पूर्णविराम लागला आहे. या युद्धाची सुरुवात पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे झाली होती. त्यानंतर तातडीने भारताने कायदेशीर स्ट्राइक करत पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली होती.
यामध्ये भारतात असणाऱ्या पाकिस्तानी लोकांना हद्दपार करून दोन्ही देशातील व्यापार बंद केला. तसेच जलकोंडी करत सिंधु नदीचे पाणीही थांबवले आणि डिजिटल स्ट्राइक करत सर्व चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. मात्र आज संध्याकाळपासून जरी युद्ध थांबले असेल तरी देखील हे निर्णय कायम ठेवले आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.