संपूर्ण राज्यात काही दिवसांपासून औरंग्याच्या कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आंदोलनानंतर सायंकाळी अचानक दोन गटात मोठा राडा झाल्याचे दृश संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. त्यानंतर राजकीय नेत्यांचा यावरून आरोप प्रत्यारोपांचा एकमेकांवर भडीमार सुरू झाला.या सर्व घटनेनंतर ज्या कबरीवरून हा सगळा वाद निर्मान झाला.त्या खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाने अधिक वाढवली आहे. दर्ग्याच्या आतल्या बाजूला भिंत नसलेल्या ठिकाणी पंधरा ते अठरा फुटाची लोखंडी पत्रे कायमस्वरूपी लावले होते.त्या पत्र्यावर कोणी चढू नये म्हणून पत्र्याच्यावरच्या बाजूला काटेरी तारेचे कुंपण करण्यात आले आहे. त्यामुळे पत्र्याच्या वर असल्या काटेरी लोखंडी तारकुंपणामुळे आता कोणालाही कबरी पर्यंत पोहोचता येणार नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.