राज्यातील अकरावीच्या प्रवेशाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षण संचालनालयाने दोन दिवस आधीच पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही यादी 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचं आधी सांगण्यात आलं होतं, मात्र अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे आजच (28 जून) ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. यंदा राज्यभरातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. या यादीनुसार, ज्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले आहे, त्यांनी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा. संगणकीय प्रणालीत आवश्यक बदल करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व योग्य पद्धतीने पार पाडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नाव पहिल्या गुणवत्ता यादीत आहे की नाही, याची खात्री करून प्रवेशाबाबतचा निर्णय घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.