संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडची कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आली. यामुळे राज्यात आंदोलने करण्यात आली. लोकांच्या मनात संतापाची लाट होती. आता याप्रकरणी देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जेष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्तीवर गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येक वेळेस आंदोलनाने उपोषण केल्यानंतरच साकार दखल घेते हे दुर्दैव आहे. एका मागणी वरती आम्ही समाधानी आहोत, मात्र बाकीचे देखील मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे गावकऱ्यांनी सांगितले. कृष्णा आंधळे अटक करावी त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी पाठवून त्यांच्यासोबत संवाद साधून आम्ही पुढील आंदोलनाचा निर्णय घेऊ. मात्र आम्ही अद्याप अन्नत्याग आंदोलनावरती काम होत असे गावकऱ्यांनी सांगितलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.