29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी भव्य मोर्चा होणार
मनोज जरांगे पाटील आंदोलनाचे नेतृत्व करत असून मोठा पाठिंबा मिळतोय
गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाला विरोध करीत पोलिसांकडे तक्रार दाखल केली
जरांगे पाटलांना थेट इशारा देत सदावर्तेंनी सडकून टीका केली
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत लाखोंच्या संख्येने धडकणार आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. अशातच या आंदोलनाला आता विरोध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा पवित्रा उचलला आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे, पाहा त्या संदर्भात व्हिडिओ.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.