विधानसभा निवडणुकीच्यावेळेस महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केली होती. त्यानंतर अधिवेशनात देखील कर्जमाफीबद्दल कुठलीही घोषणा सरकारने केली नाही. यासंदर्भात विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार यांनी हात झटकले.
अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेल नाही, असे म्हणत अजित पवार यांनी तिथून काढता पाय घेतला. अजित पवारांच्या या व्यक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.