बीड हत्याकांड प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना एसआयटी चौकशीची मागणी केली होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्षांचं नाव समोर येत आहे.
'बीड जिल्ह्यात झालेली घटना ही अतिशय निर्घृण आहे. या सरपंच हत्ये प्रकरणी स्पेशल एसआयटी कॉनस्टीट्यूटकडून चौकशी करण्यात येईल. यात जो कोणी आरोपी असेल, तो कोणीही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही', असं देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.