Prithviraj Chavhan : राज्यातील सत्तांतरावर पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; पहा व्हिडिओ

Maharashtra Politics : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचं बीगुल वाजणार आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या निवडणूका होणार असल्याच बोललं जात आहे. या अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी साम टीव्हीच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचं बीगुल वाजणार आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या निवडणूका होणार असल्याच बोललं जात आहे. त्यादृष्टीने आता सगळे पक्ष कामाला लागले आहेत. या अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी साम टीव्हीच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.

यावेळी बोलतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात सत्तांतर होणे अटळ असल्याचं मोठे विधान केलं आहे. राज्याच्या निवडणुका या मुद्दाम ठरवून पुढे ढकलण्यात आल्या असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे. ''संविधानातून राजकीय आरक्षण सरकारने देऊ केल तरी निवडणुकच घेणार नसाल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय?'' असा सवाल त्यांनी रखडलेल्या महापालिका निवडणुकांवर उपस्थित केला. राज्यातील निवडणुकांबद्दल भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 100 पर्यंत जागा मिळणार आहे. तर कॉँग्रेसची आकडेवारी 183 च्या पुढे जाणार असल्याचं अनेक सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलं असल्यानं राज्यात सत्तांतर अटळ असल्याच मोठ विधान त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर राज्यात राष्ट्रपती राजवट लाहगु होईल का? निवडणुका कधी होतील ? अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com