नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालाचा गुलाल आज उधळणार आहे. सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढायला सुरुवात झाली आहे. अशातच शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांवरून विरोधकांवर त्यांनी जोरदार टीका केली. उबाठा आणि मामू असा उल्लेख करत विरोधकांचे अस्तित्व संपल्याचे म्हटले. कार्यकर्त्यांचे महत्त्व आणि निवडणुकीतील यशाबद्दल सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. विरोधकांनी सभा न घेतल्याने त्यांचा पराभव झाल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच आम्ही कार्यकर्त्यांसाठी लढलो. त्यांच्यासाठीच आम्ही ही निवडणूक गांभीर्याने घेतली होती असे संजय शिरसाट म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.