राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता, वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असं चंदरशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
तसंच, ज्या शेतकऱ्यांकडे गाडी-घोडा, फार्महाऊस आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मात्र डोक्यावर कर्जाचा बोजा असणाऱ्या मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच केली जाईल, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. लातूर जिल्ह्यातील लामजना येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी हे विधान केले. मंत्री बावनकुळे यांनी ही भूमिका मांडल्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.