रायगड पालकमंत्रीपदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात संघर्ष
15 ऑगस्टला झेंडावंदनाचा मान अदिती तटकरे यांना मिळाला
भरत गोगावले यांनी दिल्ली दौऱ्यावर जात मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजेरी लावली
लवकरच हे पद मिळेल असा गोगावले यांचा विश्वास
रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदावरून मंत्री अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये, यामुळे महायुतीमध्ये देखील वाद सुरू असताना काल 15 ऑगस्टला झेंडावंदनचा मान हा अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर भरत गोगावले हे नाराज असून आज त्यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीला देखील गैरहजेरी लावली आणि थेट दिल्ली गाठली.
भरत गोंगावले यावर संवाद साधत म्हणाले, दिल्ली दौरा हा पूर्वनियोजितच होता. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले होते आणि काल संध्याकाळी झेंडावंदन कोण करेल याची यादी जाहीर झाली. वरून जो आदेश आला आहे त्याचे आम्ही पालन करू. आज ना उद्या आम्हाला पालकमंत्रीद मिळेल. यंदा त्यांना हा मान दिला आहे पुढच्या वेळी आम्हाला मिळेल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.