बांगलादेशने भारतात २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेश सरकारने २०२६ च्या विश्वचषकातून आपले नाव मागे घेतलंय. आयसीसीने बांगलादेशला आपला निर्णय सादर करण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला होता. २१ जानेवारी रोजी बांगलादेशसह अनेक देशांनी आयसीसी आणि आयसीसी यांच्यातील बैठकीला हजेरी लावली.
आयसीसीने यापूर्वी बांगलादेशला भारतात टी-२० विश्वचषक खेळण्यास सांगितले होते. २२ जानेवारी रोजी बांगलादेशने २०२६ चा विश्वचषक भारतात खेळण्यास नकार दिला. परिणामी, बांगलादेश आता विश्वचषकातून बाहेर पडलाय. बांगलादेशने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, "आयसीसीने आमचे सामने भारताबाहेर हलवण्यास नकार दिला आहे. आम्हाला क्रिकेटच्या भविष्याबद्दल चिंता आहे कारण त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत आहे आणि २० कोटी लोकांना खेळापासून दूर ठेवले जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.