T-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात संघ पाठवण्यास नकार देत नवा वाद ओढवून घेतलाय. सुरक्षेचे कारण आणि सरकारच्या सल्ल्याचा हवाला देत 'बीसीबी'ने हा निर्णय घेतलाय. आयपीएलमधून मुस्तफिजूर रहमानला रिलीज केल्यानंतर बांगलादेशने हे पाऊल उचललंय. त्यांनी आपले सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केलीय या निर्णयामुळे स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयसीसीकडून बांग्लादेश क्रिकेट बोर्डावर काही कारवाई करण्यात येणार का? स्पर्धेला सुरूवात होण्यास फक्त १ महिन्याचा कालावधी राहिला असताना वेळापत्रकात बदल करणं शक्य नसल्याचे क्रीडा समीक्षकांनी सांगितलेय. बांगलादेशच्या मागणीवर आयसीसी काय निर्णय घेणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.