प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
शेतकरी प्रश्नांवर सखोल चर्चा झाली असून आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत मंथन झाले.
यवतमाळ यात्रेसाठी राज ठाकरेंना अधिकृत निमंत्रण देण्यात आले.
सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या भूमिकेवर बच्चू कडूंनी टीका केली.
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्यांवर चर्चा केली. यावेळी कडू यांनी राज ठाकरेंना यवतमाळमध्ये होणाऱ्या यात्रेचे देखील निमंत्रण दिले. बच्चू कडूंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा विषय हाच संवाद होता. त्याबाबतीत कशाप्रकरे पुढे गेले पाहिजे. पुढचे आंदोलन कसे, कधी आणि केव्हा करणं व्यवस्थित होईल. या विषयांवर चर्चा झाली. आमचा हेतु हाच आहे की आंदोलन बच्चू कडूच्या नावापुरती न राहता शेतकरी म्हणून कसे पुढे जाईल. मी मोठं होणं हा महत्वाचा विषय नाही. सध्या शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि सरकार त्याची जी काही टिंगलबाजी करत आहे. ते फारच चुकीचं आहे असे बच्चू कडू म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.