महायुती सरकारविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला . दरम्यान उच्च न्यायालयाने बच्चू कडू यांना आंदोलनस्थळी खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम होते. यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापलं.
न्यायालयाने दिलेली संपल्यानंतर बच्चू कडू आपल्या समर्थकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये स्वत:ला अटक करून घेण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिस स्टेशन शेजारी त्यांनी ठिय्या मांडला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी विपिन इटनकर आले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी त्यांनी सर्वांसमोर झापलं. आधी बसलो होतो तेथे कोणी आलं नाही. आता तुम्हाला वेळ मिळाला का असा सवाल कडू यांनी केला. आम्ही तिथं बसलो होतो तेव्हा कोणी आले नाही, आता वेळ भेटला का? असा प्रश्न करत कडू त्यांच्यावर संतापले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.