रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे.त्याचा परिणाम म्हणून अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होऊ लागलं आहे.राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून ३.५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात सध्या २.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, आज अखेर धरण परिसरात २,०२३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान धरण परिसराची कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी उपविभागीय अभियंता व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. धरण व त्याची इतर उपसंरचना सुस्थितीत असून परिसर सी.सी.टीव्हीच्या निगराणीखाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान सांडव्यावरील विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागामार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.