Sanjay Raut: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे; कर्जमाफीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत कडाडले, VIDEO

Maharashtra Politics: अजित पवार यांनी शेतकऱ्यांचा आणि लाडक्या बहीणींचा वचनभंग केल्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला पाहिजे.

विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. तसेच लाडक्या बहीणींना 2100 रुपये दिले जातील असे ही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला या सगळ्या आश्वासनांचा विसर पडला. अजित पवार यांनी काही दिवसपूर्वी आपल्या भाषणात शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत आपल्या कर्जाची रक्कम भरा असे सांगितल्यानंतर शेतकरी हे सरकारवर तीव्र आक्रमक झाले आहे.

या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे. संजय राऊत म्हणाले, अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच असे जोर देऊन देऊन सांगत होते. आता अजित पवार यांनी हात वर केले आहेत. अजित पवार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर ते कर्जमाफी करू शकत नसेल आणि लाडक्या बहिणींना 2100 देणार नसेल. तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे.अशी संजय राऊत यांनी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com