IND vs BAN, Super 8: टीम इंडियाचा डाव फसला! विराट- रोहितची जोडी पुन्हा एकदा फ्लॉप; पाहा स्पर्धेतील कामगिरी

Virat Kohli - Rohit Sharma Flop Show In T20 World Cup 2024: रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर येत आहे. मात्र ही जोडी आतापर्यंत फ्लॉप ठरली आहे.
IND vs BAN, Super 8: टीम इंडियाचा डाव फसला! विराट- रोहितची जोडी पुन्हा एकदा फ्लॉप; पाहा स्पर्धेतील कामगिरी
virat kohli with rohit sharmatwitter

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील सामना सुरु आहे. हा सामना अँटिग्वाच्या सर विवियन रिचर्ड्स मैदानावर सुरु आहे. सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ४७ धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही.

भारत विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. मात्र या जोडीला या स्पर्धेत हवी तशी सुरुवात करुन देता आलेली नाही.

IND vs BAN, Super 8: टीम इंडियाचा डाव फसला! विराट- रोहितची जोडी पुन्हा एकदा फ्लॉप; पाहा स्पर्धेतील कामगिरी
IND vs BAN, Pitch Report: टॉस ठरणार बॉस! बांगलादेशला हरवण्यासाठी टीम इंडियाने आधी काय करावं?

विराट- रोहितची जोडी फ्लॉप

या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करायला मैदानावर येणार अशी चर्चा सुरु होती. मात्र स्पर्धा सुरु झाल्यापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानावर येत आहे. मात्र दोघांनाही संघासाठी चांगली सुरुवात करुन देता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात या जोडीने २२ धावा जोडल्या होत्या.

IND vs BAN, Super 8: टीम इंडियाचा डाव फसला! विराट- रोहितची जोडी पुन्हा एकदा फ्लॉप; पाहा स्पर्धेतील कामगिरी
IND vs BAN,Weather Prediction: IND vs BAN सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आली मोठी अपडेट

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात या जोडीला १२ धावा जोडता आल्या होत्या. अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात दोघांना १ धाव जोडता आली होती. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ११ आणि बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात दोघांना ३९ धावा जोडता आल्या आहेत.

यापूर्वी रोहित सलामीला यायचा तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्यामुळे सलामी जोडी फ्लॉप झाल्यानंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर येऊन डाव सांभाळायचा मात्र आता दोघेही लवकर बाद झाल्याने भारतीय संघावर दबाव येतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com