Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर

Indian Players Return In India, T-20 World Cup: लवकरच सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. हे सामने सुरु होण्यापूर्वी २ भारतीय खेळाडू मायदेशी परतणार आहेत.
Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर
team indiatwitter/BCCI
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत शानदार खेळ केला आहे.आयर्लंड, पाकिस्तान आणि त्यानंतर अमेरिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघासह ४ राखीव खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. यापैकी दोन खेळाडू सुपर ८ पूर्वीच मायदेशी परतणार आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी ४ राखीव खेळाडू अमेरिकेला गेले होते. त्यात रिंकू सिंग,शुभमन गिल, आवेश खान आणि खलिल अहमद यांचा समावेश होता. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार शुभमन गिल आणि आवेश खान मायदेशी परतणार आहेत. तर रिंकू सिंग आणि खलिल अहमद भारतीय संघासोबत राहतील. भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्ये होणार आहे.

Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर
IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली

मायदेशी पाठवण्याचं कारण काय?

या स्पर्धेसाठी प्रमुख संघात १५ खेळाडूंची निवड केली गेली आहे. तर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला किंवा काही कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याची जागा भरून काढण्यासाठी ४ खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं होतं. जर १५ जूनपर्यंत कुठलाही खेळाडू दुखापतग्रस्त झाला नाही तर शुभमन गिल आणि आवेश खान यांना मायदेशी पाठवलं जाईल. या दोन्ही खेळाडूंचा व्हिसा हा अमेरिकापुरताच मर्यादित होता. भारतीय संघाचे पुढील सामने वेस्टइंडिजमध्ये होणार आहेत. त्यामुळे या दोघांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर
IND vs USA, Rohit Sharma: अमेरिकेच्या संघात 'बोरीवली बॉईज'; रवी शास्त्रींच्या प्रश्नावर रोहित काय म्हणाला?

भारतीय संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. या तीनही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. यासह सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर चौथा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे सुपर ८ फेरीतील सामने २० जून २२ जून आणि २४ जून रोजी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com