
India vs Australia,Semi Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी जाऊन पोहोचला आहे. याचा अर्थ असा की, ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ ग्रुप बी मध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनल खेळणार आहे.
आयसीसीच्या नोकआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. मात्र यावेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाला मात देणार का? याबाबत माजी भारतीय खेळाडूने मोठं वक्तव्य केलं आहे.
भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज दिपदास गुप्ता यांच्या मते, भारतीय संघाच्या खरा आव्हानाला आता सुरुवात झाली आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवलं. त्यानंतर पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडला हरवलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत बोलताना दिपदास गुप्ता म्हणाले, ‘आता खऱ्या अर्थाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाकडे सुवर्णसंधी आहे. पण हा मार्ग मुळीच सोपा नसेल. भारताला चॅम्पियन बनायचंय तर समोर कोण आहे याचा विचार करत बसावं लागणार नाही.’
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ १५१ वेळेस आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाने ८४ वेळेस बाजी मारली आहे. तर भारतीय संघाने ५७ सामने जिंकले आहेत. ही आकडेवारी पाहिली, तर हे स्पष्ट होतंय की, ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर भारी आहे.
मात्र आयसीसी नॉकआऊट्समध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड बरोबरीत राहिला आहे. दोन्ही संघ ६-६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ३ तर ऑस्ट्रेलियाने ३ सामने जिंकले आहेत. यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.