Hardik Pandya: दुखापतीनंतर कमबॅक, आता मॅचविनर; हार्डहिटर हार्दिक पंड्यानं स्वतःला इतकं कसं बदललं?

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पंड्यानं तुफानी फलंदाजी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
Hardik Pandya Asia Cup 2022 Latest Marathi Update
Hardik Pandya Asia Cup 2022 Latest Marathi UpdateSAAM TV
Published On

Asia Cup India vs Pakistan T20: आशिया चषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज टी २० सामन्यात भारतानं जबरदस्त विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल करणाऱ्या मॅचविनर हार्दिक पंड्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दुखापतीनंतर टीम इंडियाबाहेर गेलेला हार्दिक पंड्या संघात परतल्यानंतर इतका कसा बदलला? त्यानं स्वतःला कसं बदललं? याबाबत स्वतः टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं उत्तर दिलं.

पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारताचा हार्डहिटर हार्दिक पंड्याचीच (Hardik Pandya) जोरदार चर्चा आहे. अखेरच्या षटकांत जवळपास २०० च्या स्ट्राइकनं तुफानी फलंदाजी करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या हार्दिकचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियात (Team India) कमबॅक आणि त्यानंतर आता मॅचविनर असा त्याचा प्रवास अचंबित करणारा आहे. हार्दिकनं स्वतःला इतकं कसं बदललं याचं उत्तर स्वतः रोहित शर्मा याने दिलं आहे.

Hardik Pandya Asia Cup 2022 Latest Marathi Update
IND vs PAK Asia Cup : भारताने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ; ही आहेत विजयाची ६ कारणे

हार्दिक पंड्यानं टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर तो आता स्वतःचा खेळ चांगल्या तऱ्हेने समजू लागला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी याबाबतीत स्वतःच्या कामगिरीवर त्याला पूर्ण विश्वास आहे, असे रोहित शर्मा म्हणाला.

Hardik Pandya Asia Cup 2022 Latest Marathi Update
Team India : टीम इंडियाच्या अडचणी संपेनात, आता ऑलराउंडरलाही दुखापत

रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिक पंड्या असा खेळाडू आहे की वेगवेगळ्या परिस्थितीत त्याला कसं खेळायचं आहे, हे तो उत्तमरित्या जाणतो. ज्यावेळी हार्दिकने पुनरागमन केलं, त्यानंतर त्याची कामगिरी उत्तम होत आहे. ज्यावेळी तो संघात नव्हता त्यावेळी आपलं फिटनेस चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्याने ओळखलं. आता तो १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे.

तो किती चांगला फलंदाज आहे हे आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. पुनरागमन केल्यानंतर त्याने चांगली कामगिरी केली आहे. आता तो अधिक शांत झाला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत काय केलं पाहिजे, याबाबत त्याला अधिक खात्री आहे, असेही रोहित शर्मा म्हणाला.

तत्पूर्वी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने अष्टपैलू कामगिरी केली. त्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला. हार्दिकने गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. तर १७ चेंडूंवर ३३ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात विजयी षटकार लगावत हार्दिकने संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर भारतीय संघासह हार्दिक पंड्याचं कौतुक तर होतच आहे, पण चाहते भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com