ICC Champions Trophy 2025: शेपूट वाकडं ते वाकडंच! म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला हरवा; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा VIDEO व्हायरल

Pakistan Prime Minister Shehbaz Sharif Comments on India vs Pakistan Match: पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी खेळाडूंना आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले.
Pakistan cricket team
Pakistan cricket teamgoogle
Published On

१९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॅाफी २०२५ (ICC Champions Trophy 2025 )ला सुरुवात होत आहे. पहिलाच सामना यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड असा रंगणार आहे. जवळपास २९ वर्षानंतर पाकिस्तान आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी आगामी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी एक मोठे आव्हान ठेवले आहे.

नूतनीकरण केलेल्या आणि सुधारित गद्दाफी स्टेडियमच्या उद्घाटन समारंभात बोलताना शरीफ यांनी खेळाडूंना भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानचे खरे आव्हान केवळ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे नाही तर २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताला हरवणे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत अनेक आठवड्यांच्या विचारविनिमयानंतर, बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी एका हायब्रिड मॉडेलचा निर्णय घेतला जेथे भारताचे सामने यूएईमध्ये खेळवले जातील.

पाकिस्तानच्या पंतप्रधानाचं भारताला हरवण्याचं स्वप्न

पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्य ट्रॅाफी २०२५ स्पर्धेचे आयोजन करत आहे. यासाठी गद्दाफी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले. केवळ ११७ दिवसांत हे काम पूर्ण झाल्याबद्दल या समारंभात आनंद साजरा करण्यात आला. २९ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल शरीफ यांनी उत्साह व्यक्त केला. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, ' खरे आव्हान केवळ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे नाही तर २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये भारताला हरवणे आहे.जवळपास २९ वर्षांनंतर आपण आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहोत ही पाकिस्तानसाठी एक मोठी संधी आहे'.

Pakistan cricket team
India vs England Seond ODI: अय्यर, गिल की...! दुसऱ्या वनडेत कोहलीचं कमबॅक, कोणाचा पत्ता होणार कट? भारताची संभाव्य प्लेइंग ११

आमचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांनी अलिकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे, पण आता खरे आव्हान केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणेच नाही तर दुबईतील आगामी सामन्यात आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी भारताला हरवणे आहे. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे," असे शरीफ यांनी सांगितले. शिवाय, शरीफ म्हणाले की, पाकिस्तानसाठी २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणे ही एक मोठी संधी असेल कारण शेवटचा एकदिवसीय विश्वचषक १९९६ मध्ये भारत आणि श्रीलंकेसह सह-यजमानपद भूषवला होता.

भारताचं पाकिस्तानवर वर्चस्व

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून भारताने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे, तेव्हापासून खेळल्या गेलेल्या सहा एकदिवसीय सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले आहे , तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे, दोन्ही संघ या स्पर्धेत काही चांगले रेकॉर्ड घेऊन येतील. ज्यामुळे आगामी सामना आणखी रोमांचक होईल.पाकिस्तान पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे.

१९९६ नंतर येथे खेळला जाणारा हा पहिलाच आयसीसी कार्यक्रम आहे. भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या संघाला पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील रेकॅार्डस बघितले तर, दोन्ही प्रतिस्पर्धी पाच वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने तीन आणि भारताने दोन सामने जिंकले आहेत.

Pakistan cricket team
Rohit Sharma: वनडेच्या कर्णधारपदासाठी नवं नाव समोर; 'हा' खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com