Ranji Trophy: मुंबईच्या संघाने ४१ वेळा मिळवलं फायनलचं तिकीट; असा राहिलाय मुंबईचा इतिहास

Ranji Trophy: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात मुंबईच्या संघाने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलंय. गोलंदाजांच्या दमदार खेळीमुळे मुंबईने तामिळनाडूच्या संघाला सेमी फायनलमध्ये पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारलीय.विकेट्स घेण्यासोबतच गोलंदाजांनीही मुंबईसाठी फलंदाजी करत धावा केल्या. तळाच्या तीन फलंदाजांनी संघासाठी २२४ धावा जोडल्या.
Ranji Trophy  Final
Ranji Trophy Final BCCI
Published On

Mumbai Team Reach In Ranji Trophy Final :

रणजी ट्रॉफीमधील सेमी फायनलमध्ये मुंबईच्या संघाने तामिळनाडूला पराभूत करत ४१ व्या वेळी अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलंय. सेमी फायनलच्या सामन्यात मुंबईने एकाच डावात ७० धावा करत तामिळनाडूच्या संघाला पराभूत केलं. मुंबईचा संघ ४७व्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलाय.(Latest News)

मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक वेळा रणजी ट्रॉफी फायनल जिंकलीय. रणजी ट्रॉफीमधील सेमी फायनलमध्ये मुंबईच्या संघाने तामिळनाडूला पराभूत करत ४१ व्या वेळी अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलंय. सेमी फायनलच्या सामन्यात मुंबईने एकाच डावात ७० धावा करत तामिळनाडूच्या संघाला पराभूत केलं. ४८व्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईचा संघ ४१ वेळा अंतिम फेरीत पोहोचलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईने २०२२-२३ च्या मोसमात अंतिम सामन्यात मुंबईचा सामना मध्य प्रदेशसोबत झाला होता. यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. मुंबई संघाने २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील शेवटचा विजय मिळवला होता. या सामन्यात सौराष्ट्राचा पराभव केला होता. आत्तापर्यंतच्या रणजी ट्रॉफीत मुंबईचा संघ सर्वोधिक वेळा जिंकलाय. मुंबईने आतापर्यंत एकूण ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकलीय. मुंबईच्या जवळपास कोणताच संघ जवळपास नाहीये. मुंबईनंतर दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीने आतापर्यंत १५ वेळा रणजी ट्रॉफी जिंकलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com