BCCI Prize Money: BCCI ने दिलेल्या 125 कोटींची विभागणी कशी केली जाणार? प्रत्येक खेळाडूला किती रक्कम मिळणार?

BCCI Prize Money Distribution: बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी १२५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. या बक्षिसाची विभागणी कशी केली जाणार?
BCCI Prize Money:  BCCI ने दिलेल्या 125 कोटींची विभागणी कशी केली जाणार? प्रत्येक खेळाडूला किती रक्कम मिळणार?
indian cricket teamtwitter
Published On

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. एकही सामना न गमावता भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह रोहित अँड कंपनीने २००७ नंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर चहूबाजूंनी भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

भारतीय संघाच्या विजयानंतर बीसीसीआयने वर्ल्डकप विजेत्या संघासाठी १२५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं. हे बक्षीस वर्ल्डकप विजय परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाच्या हाती सोपवण्यात आलं. मात्र या १२५ कोटींची विभागणी कशी केली जाणार? जाणून घ्या.

BCCI Prize Money:  BCCI ने दिलेल्या 125 कोटींची विभागणी कशी केली जाणार? प्रत्येक खेळाडूला किती रक्कम मिळणार?
IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. तर ४ राखीव खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं होतं. दरम्यान १२५ कोटींचा धनादेश हा खेळाडूंसह राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांमध्ये विभागला जाणार आहे. वर्ल्डकप विजेत्या संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. बॅकरूममधील सदस्यांना प्रत्येकी २ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर निवड समितीतील सदस्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासह राखीव खेळाडूंना देखील प्रत्येकी १ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

BCCI Prize Money:  BCCI ने दिलेल्या 125 कोटींची विभागणी कशी केली जाणार? प्रत्येक खेळाडूला किती रक्कम मिळणार?
IND vs ZIM: झिम्बाब्वेचा पराभव करत टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया,पाकिस्तानला मात; तोडला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड

भारतीय संघाचा विजय

भारतीय संघाने गेल्या ११ वर्षांपासून आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकली नव्हती. भारतीय संघाने आयसीसीच्या सेमिफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र ट्रॉफी जिंकता आली नव्हती. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com