
नवी दिल्लीत होत असलेल्या खो-खो वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने प्रवेश केलाय. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून सातत्याने विजय मिळवत असलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरीतही आपले वर्चस्व कायम राखले. दक्षिण आफ्रिकेचा 50 पाईंटच्या फरकाने पराभव केलाय.
महिला संघासह पुरुषांचा संघदेखील सेमी फायनलमध्ये गेला होता. आता पुरुषांच्या संघदेखील अंतिम सामन्यात जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. भारताने खो-खो वर्ल्डकप २०२५च्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी मैदानावर चालू असलेल्या खो-खो वर्ल्ड कपच्या स्पर्धेत १८ जानेवारीला सेमी फायनलचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचा या स्पर्धेत दबदबा काय काय राहिलाय.
सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत दोन हात करण्याआधी भारतीय महिला संघ क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशशी सामना केला. यात भारताच्या संघाने बांगला देशाला १०९-१६ पाईंट्सने धूळ चारली. आजच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी केली. परंतु आफ्रिकेच्या संघाने कडवी झुंज दिली. भारतीय संघाने पहिल्या टर्ममध्ये आक्रमण करून सामन्याची सुरुवात केली आणि तिथूनच सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली.
पण दक्षिण आफ्रिकेने भारताला सहजासहजी पाईंट मिळून दिले नाहीत. पण त्यांनाही जास्त पाईंट करता आले नाहीत. अखेरीस, ४ टर्न पूर्ण झाल्यानंतर भारताने ६६- १६ गुणांसह सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत युगांडाचा ८९-१८ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या नेपाळला आता विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना करावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.