IPL 2021: प्लेऑफ गाठण्यासाठी संघांची काय आहेत गणितं?
IPL 2021: प्लेऑफ गाठण्यासाठी संघांची काय आहेत गणितं? Twitter/@IPL

IPL 2021: प्लेऑफ गाठण्यासाठी संघांची काय आहेत गणितं?

आयपीएल 2021 (IPL 2021) चे 43 सामने झाले आहेत. साखळी फेरीत 13 सामने शिल्लक आहेत.

आयपीएल 2021 (IPL 2021) चे 43 सामने झाले आहेत. साखळी फेरीत 13 सामने शिल्लक आहेत. प्रत्येक संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Supar Kings) संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्याच वेळी, उर्वरित सहा संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांची काय समिकरणं आहेत ते आपण पाहूयात.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नईचे 10 सामन्यांत आठ विजय आणि दोन पराभवांसह 16 गुण आहेत. त्याचा नेट रेट +1.069 आहे. चेन्नईने जवळजवळ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. जर त्याने आणखी एक सामना जिंकला तर ते अधिकृतपणे प्लेऑफमध्ये पोहोचतील.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्लीने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तीन हरले आहेत. त्यांचे 16 गुण आहेत. दिल्लीचे नेट रनरेट +0.562 आहे. दिल्ली संघाची स्थिती चेन्नईसारखीच आहे. तेही जवळपास प्लेऑफमध्ये पोहचले आहेत, पण तीन सामन्यांमध्ये एका विजयाने त्याचं प्लेऑफ मधील स्थान पक्के करेल.

IPL 2021: प्लेऑफ गाठण्यासाठी संघांची काय आहेत गणितं?
National U-23 Championship : महाराष्ट्राची स्नेहा जाधव चमकली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

बेंगळुरू संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव करून प्लेऑप जाण्याचे आपेल रस्ते मोकळे केले आहेत. संघाने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत तर 4 मध्ये पराभूत झाले आहेत. आरसीबीचे 14 गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना 3 पैकी किमान 1 सामना जिंकणे आवश्यक आहे. RCB चा नेट रनरेट -0.200 आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाताचे 11 सामन्यांमध्ये 10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये सहज पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. एक सामना गमावल्यानंतर त्यांचा रस्ता खडतर होऊ शकतो. तथापि, संघाच्या बाजूने चांगली गोष्ट म्हणजे त्यांना नेट रनरेट (+0.363) आहे जो की खालच्या बाकी संघांपेक्षा चांगला आहे. त्यांचे पुढील सामने पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याशी होणार आहेत.

मुंबई इंडियन्स

पइंट टेबलमध्ये कोलकाताच्या खाली असूनही, मुंबईचा संघ असा आहे की त्याच्याकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची क्षमता आहे. रोहित शर्माच्या संघाचा इतिहास त्याला साक्षिदार आहे कारण शेवटी शेवटी सामने जिंकून आयपीएल जिंकली आहे. 11 सामन्यांत 5 विजयांसह मुंबईचे 10 गुण आहेत. त्याचा नेट रनरेट -0.453 आहे. संघाला पुढील सामन्यात मजबूत दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामना करायचा आहे.

पंजाब किंग्ज

स्पर्धेतील सर्वात अशुभ संघ मानला जाणारा, आता प्रत्येक सामना पंजाब किंग्जसाठी करा किंवा मरो असणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार आहेत. त्यांचे 11 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण आहेत. पंजाबला पुढील तीन सामने मजबूत संघांविरुद्ध खेळायचे आहेत. त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्स, आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याशी होणार आहे. एका पराभवाने ते शर्यतीतून बाहेर पडणार आहेत.

राजस्थान रॉयल्स

राजस्थानची स्थिती कमी -अधिक प्रमाणात पंजाबसारखीच आहे. संजू सॅमसनचा संघ चांगली स्पर्धा करतो, पण तो सामना पूर्ण करू शकत नाही. आरसीबीच्या विरोधातही, संघाने चांगली सुरुवात केल्यानंतर गडबड केली आणि दुसरा सामना गमावला. आता राजस्थान रॉयल्स त्यांच्या कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफमध्ये पोहोचू शकत नाही. संघाचे 11 सामन्यात 8 गुण आहेत.

सनरायझर्स हैदराबाद

2016 चा चॅम्पियन्स आणि गेल्या काही हंगामात निश्चितपणे प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या सनरायझर्ससाठी हा न विसरण्याजोगा हंगाम होता. त्यांचे 10 सामन्यांमध्ये 4 गुण आहेत. संघाने फक्त दोन सामने जिंकले आहेत. आता जर सनरायझर्स संघाने चेन्नई, कोलकाता, आरसीबी आणि मुंबईला त्यांच्या चार सामन्यांमध्ये पराभूत केले तर आशेचा किरण दिसू लागेल. मात्र, तरीही त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे लागेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com