
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडू आपल्या दंडावर हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरले. दरम्यान खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानावर उतरण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.
बीसीसीआयने अवयव दान करण्याची नवी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला समर्थन करण्यासाठी भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले. बीसीसीआयने याबाबत माहिती देत म्हटले की, “दोन्ही संघातील खेळाडू अवयव दानाच्या महिलेला समर्थन करण्यासाठी दंडावर हिरव्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत."
जय शहा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “ एक प्रतिज्ञा एक निर्णय कितीतरी लोकांचं जीव वाचवू शकतो. त्यामुळे एकत्र या आणि प्रतिज्ञा घ्या...“ बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. ज्यात भारतीय खेळाडू अवयव दानाचे महत्व सांगताना दिसून आले होते.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ३५६ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ११२ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने ७८ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५२ धावा केल्या. केएल राहुलने शेवटी फलंदाजी करताना ४० धावा केल्या.
या डावात फलंदाजी करताना गिलने सर्वात जलद २५०० धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यासह त्याचं हे शतकही विक्रमी ठरलं आहे. गिलने अहमदाबादच्या मैदानावर खेळताना वनडे, टी-२० आणि कसोटी क्रिकेट खेळताना शतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज बनण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.