
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा डाव फसलेला दिसून येत आहे.
पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांचा डोंगर उभारला. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले आहेत.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानावर आली. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आलेली नाही. सलामीला आलेला रोहित शर्मा अवघ्या ३ धावा करत माघारी परतला.
भारताला अवघ्या ८ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुल बाद झाला. फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल २४ धावा करत माघारी परतला.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्टासने ६० धावांची शानदार खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने ५७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने ७२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना, स्टीव स्मिथने १४० धावांची खेळी केली. शेवटी पॅट कमिन्सने ४९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांपर्यंत मजल मारली.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने ३ गडी बाद केले. तर आकाश दीपने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.