
चॅम्पियन ट्रॉफीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताच्या सलग दुसऱ्या विजयामुळे भारत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता दुणावली आहे. तर सलग दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. भारताने ऐतिहासिक विजयानंतर महाराष्ट्रात क्रिकेटप्रेमींमध्ये विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.
भारताच्या विजयानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. भारताच्या विजयानंतर क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडत जल्लोष केला. नागपुरातील क्रिकेटप्रेमींनी धरमपेठ येथील लक्ष्मीभवन चौकात जल्लोष केला. नागपुरातील क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडून आतिषबाजी केली. कोल्हापुरातील क्रिकेट प्रेमींनी शिवाजी चौकात येऊन जल्लोष साजरा केला. तर पुणेकरांनी गुडलक चौकात भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला.
भारताच्या विजयानंतर अहिल्यानगरमध्ये क्रिकेटप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला. भारताने पाकिस्तानवर सहा विकेटने विजय मिळवल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. अहिल्यानगर शहरातील माळीवाडा येथील स्क्रीन लावून नागरिकांनी सामन्याचा आनंद घेतला.
भारताने आपला पारंपरिक स्पर्धक असलेल्या पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील युवकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. तसेच या क्रिकेटप्रेमींनी भारताला कप जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या विजयानंतर नाशिककर रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात नाशिककरांकडून गर्दी करत जल्लोष केला. 'भारत माता की जय' म्हणत नाशिककरांकडून रस्त्यावर उतरून जल्लोष केला आहे.
दरम्यान, भारताच्या विजयानंतर काश्मीरमधील क्रिकेटप्रेमींना आनंद व्यक्त केला. त्यांनी परिसरात फटाके फोडून आनंद साजरा केला. काश्मीरमधील क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.