IND vs BAN: चेन्नई कसोटी जिंकताच BCCI ची मोठी घोषणा! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Team India Squad For IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
IND vs BAN: चेन्नई कसोटी जिंकताच BCCI ची मोठी घोषणा! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर
team indiatwitter
Published On

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात लोकल बॉय आर अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने बांगलादेशवर २८० धावांनी मोठा विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत रंगणार होता. तर ठरलेल्या वेळापत्रकानुसार मालिकेतील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे. याआधी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. आता पहिला कसोटी सामना झाल्यानंतर बीसीसीआयकडून मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात कुठलाही बदल केलेला नाही. ज्या खेळाडूंना पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. तेच खेळाडू दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.

IND vs BAN: चेन्नई कसोटी जिंकताच BCCI ची मोठी घोषणा! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर
IND vs BAN 1st Test: चेन्नईत लोकल बॉय चमकला! आधी शतक, मग गोलंदाजीत पंचक; टीम इंडियाचा शानदार विजय

मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

IND vs BAN: चेन्नई कसोटी जिंकताच BCCI ची मोठी घोषणा! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर
IND vs BAN,1st Test Day 4: चौथ्या दिवशी पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान? जाणून घ्या

पहिल्या कसोटीत भारतीय संघाने मारली बाजी

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला अवघ्या १४९ धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने २८७ धावा करत बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी ५१५ धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २३४ धावांवर आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com