T20 World Cup: क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी ICC ने हा नियम बदलला

Reserve Day In T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसीने नियमात बदल केला आहे.
T20 World Cup: क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी ICC ने हा नियम बदलला
big announcement for icc t20 world cup 2024 there is no reserve day for 2nd semi final cricket news marathi amd2000saam tv

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २९ जून रोजी रंगणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील ओपनिंगचा सामना अमेरिकेततील डलासमध्ये होणार असून स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनलचे सामना वेस्टइंडीजमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने वाढवलं टेन्शन

स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना आयसीसीने सर्वच संघाचं टेन्शन वाढवलं आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धा ही २ वर्षातून एकदा येते. त्यामुळे सामन्याचा पूर्ण निकाल यावा आयसीसीच्या स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांमध्ये राखीव दिवसाची सोय केली जाते. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतही राखीव दिवस असेल. मात्र आयसीसीने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस नसणार आहे.

T20 World Cup: क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी ICC ने हा नियम बदलला
RCB vs CSK, IPL 2024: बंगळुरुच्या फॅन्ससाठी चिंता वाढवणारी बातमी! RCB vs CSK सामना रद्द होण्याची शक्यता; वाचा कारण

काय आहे कारण?

दुसऱ्या सेमीफायनलचा सामना २७ जून रोजी खेळवला जाणार आहे. जर यादिवशी पाऊस पडला आणि सामना होऊ शकला नाही, तर राखीव दिवस २८ जूनला ठेवावा लागेल. म्हणजे हा सामना जिंकणाऱ्या संघाला लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जून रोजी फायनल खेळण्यासाठी मैदानावर यावं लागेल.

T20 World Cup: क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी ICC ने हा नियम बदलला
DC vs LSG, IPL 2024: लखनऊसाठी 'करो या मरो'ची लढत; दिल्लीविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड?

सामना रद्द झाल्यास काय?

या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर पहिला सामना स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरु होईल. तर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०: ३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होणार आहे. जर सामन्यावेळी पाऊस पडला,तर त्याच दिवशी ४ मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाईल. मात्र तरीही सामना न झाल्यास हा सामना रद्द केला जाईल. हा सामना रद्द झाल्यास जो संघ सुपर ८ मध्ये मजबूत स्थितीत असेल, तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com