

वुमेंस क्रिकेट वर्ल्डकप २०२५ चा दुसरा सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मेग लॅनिंग हिने एक मोठी चिंता व्यक्त केली आहे. या सामन्यापूर्वी तिला हरमनप्रीत कौरच्या फॉर्मची चिंता सतावतेय.
मेग लॅनिंगला वाटतं की, हरमनप्रीत कौरची बॅट अजून शांत आहे. मात्र जर ती एकदा फॉर्मात आली, तर तिला थांबवणं अशक्य होईल. लॅनिंगच्या या भीतीमागे एक ठोस कारण आहे ते म्हणजे २०१७च्या वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ नाबाद रन्स करत भारताला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. त्या सामन्याची आठवण अजूनही ऑस्ट्रेलियाच्या टीमला अस्वस्थ करते.
आयसीसीसोबतच्या बोलताना लॅनिंग म्हणाली, “भारतासमोर आमच्यासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे त्यांची कर्णधार हरमनप्रीत कौर. अजूनपर्यंत तिच्या बॅटने फारसा चांगला खेळ केलेला नाही. पण सेमीफायनल सामन्यासारख्या मोठ्या क्षणी ती आपला सर्वोत्तम खेळ दाखवू शकते. एकदा ती फॉर्मात आली, तर तिला रोखणं कठीण होईल. ती भारतासाठी सर्वात महत्त्वाची खेळाडू आहे.”
भारतीय महिला टीमने लीग टप्प्यातील सातपैकी तीन सामने गमावले. ज्यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडूनही पराभव स्विकारावा लागला आहे. मात्र चौथ्या स्थानावर राहून त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता घरी खेळताना, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये पोहोचण्याचा निर्धार करतेय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत वनडे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पाहतोय.
या वर्ल्डकप हरमनप्रीतने सहा सामन्यांतील पाच डावांमध्ये १४१ रन्स केले आहेत. इंग्लंडविरुद्धची ७० रन्सची खेळी तिची सर्वोत्तम कामगिरी ठरलीये. आता सेमीफायनलच्या सामन्यात ती कोणता धमाका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.