.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
एक भयावह आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आधी ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आलं. त्यापैकी तीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसर हादरलं आहे.
खुंटीचे एसपी अमन कुमार सांगतात, ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. रनिया परिसरातील एका लग्न समारंभातून ५ मुली घरी परतत असताना काही अल्पवयीन मुले त्यांच्या मागावर होते. निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी पाचही मुलींचे अपहरण केले. तरूणांनी मुलींना जबरदस्तीने टेकडीवर नेले. त्यातील २ मुलींनी आरोपींचाहात चावला आणि तेथून पळ काढला.
यानंतर सर्व १८ आरोपींनी ३ मुलींवर सामूहिक बलात्कार केला. नंतर मुलींना जंगलात सोडून पळ काढला. काही वेळानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलींना गावात आणलं. तिन्ही मुलींचे वय १२-१६ वर्षे असल्याची माहिती आहे. तर, आरोपी मुलांचे १७ आहे. पीडित मुलींच्या कुटुंबाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
एसपी म्हणाले,पीडित मुलींच्या तक्रारीवरून आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. पोलीस पथकाने सर्व आरोपी मुलांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.