Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर पोहोचणारं शेतकरी आंदोलन सर्वोच्च न्यायालयाच्या दारात दाखल

Farmer Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा तापलाय. एकीकडे शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे हरियाणा सरकार त्यांना सीमेपलीकडे जाऊ देण्याची परवानगी देत नाहीये. दरम्यान दिल्लीच्या सीमेवर पोहोचणार हे आंदोलन आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचलंय.
Farmer Protest
Farmer ProtestSaam Tv

Farmers Protest Petition In Supreme Court :

आपल्या मागण्यासाठी सरकारसोबत तीन-चार बैठका करूनही योग्य निर्णय न हाती आलेल्याने शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दिल्लीकडे कूच करण्यास शेतकरी आग्रही आहेत. परंतु हरियाणा राज्य सरकार त्यांना पुढे जाण्यास परवानगी देत नाहीये. अशात शेतकरी आंदोलन आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय. शीख चेंबर ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक ऍग्नोस्टोस थिओस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्याची परवानगी देण्याची मागणी केलीय.(Latest News)

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत काय आहे?

सरकारने (Government) आंदोलक शेतकऱ्यांच्या (Farmer)मागण्यांचा विचार करावा, अशा सूचना न्यायालयाने द्याव्यात, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल याचिकेत करण्यात आलीय.'शेतकऱ्यांना योग्य वागणूक मिळावी. दिल्लीचा मार्ग खुला करून शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश द्यावा.आंदोलन (Agitation) करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार असून पोलिसांनी रस्त्यावर निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलक शेतकऱ्यांवर केलेल्या पोलिस बळाचा तपास आणि पोलिसांच्या कारवाईत जखमी व मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आलीय. दरम्यान शेतकरी एमएसपीच्या (हमीभावावर) मागणीवर ठाम आहेत. पंजाबमधील शेतकरी गेल्या दोन आठवड्यांपासून हरियाणाच्या सीमेवर ठान मांडून बसलेत. राज्य सरकार त्यांना पुढे त्यांना पुढे जाण्यास परवानगी देत नाहीये.

पोलीस शेतकऱ्यांवर लाठीमार करत असून शेतकऱ्यांना पांगण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या काही सीमाही सील करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना दिल्लीत यायचे आहे, पण त्यांना रोखण्यासाठी शंभू सीमेवर खिळे ठोकण्यात आलेत. काँक्रीट बॅरिकेडिंगही लावण्यात आलेत. दुसरीकडे एमएसपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण सर्वच व्यर्थ ठरल्यात.

आज 'काळा दिवस' पाळणार

शेतमालाला हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या ४ दिवसांपासून शंभू बॉर्डरवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बुधवारी (२१ फेब्रुवारी) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्या देखील झाडल्या. यावेळी एका तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शुभकरन सिंग (वय २२) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शुभकरन याच्या मृत्युनंतर शेतकरी संघटना आणखीच आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ २३ फेब्रुवारी हा दिवस देशभरात काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार, असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.

Farmer Protest
Shetkari Andolan: केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक; आज 'काळा दिवस' पाळणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com