75 मुलींशी लग्न, 200 मुलींना बनवले कॉल गर्ल; पोलिसांनी असा केला उलगडा

मुनीर असे आरोपीचे नाव असून त्याला इंदूर पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे.
75 मुलींशी लग्न, 200 मुलींना बनवले कॉल गर्ल ; पोलिसांनी असा केला उलगडा
75 मुलींशी लग्न, 200 मुलींना बनवले कॉल गर्ल ; पोलिसांनी असा केला उलगडाSaam TV
Published On

इंदूर: देशात दररोज मानवी तस्करी आणि सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातून पकडलेल्या एका तरुणाच्या गुन्हाचा खुलासा झाल्यानंतर, या प्रकरणाच्या तपासात करणाऱ्या पोलीस पथकाच्या पायाखालची जमीन हादरली आहे. मुनीर असे आरोपीचे नाव असून त्याला इंदूर पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे.

दरमहा 55 मुलींचे लक्ष्य

चौकशीदरम्यान मुनीरने प्रथम कबूल केले की बांगलादेशी मुली आणि महिला त्याचे लक्ष्य होते. तो 5 वर्षांपासून लैंगिक तस्करीच्या व्यवसायात गुंतला होता. मुनीरने कबूल केले की तो दरमहा सुमारे 55 मुलींना आपला बळी बनवत असे. या संदर्भात, मुनीरने 200 पेक्षा जास्त बांगलादेशी मुलींना भारतात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले होते.

75 मुलींशी लग्न, 200 मुलींना बनवले कॉल गर्ल ; पोलिसांनी असा केला उलगडा
विठुरायाच्या दर्शनाची तयारी पूर्ण; दररोज 10 हजार भाविकांना मिळणार मुखदर्शन

75 वेळा लग्न केले.

माध्यामांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपी मुनीर याच्यावर 10 हजार रुपयांचे बक्षीस होते. तो बांगलादेशातील जसोरचा आहे. त्याने बहुतेक मुलींशी लग्न केले आणि नंतर त्यांना भारतात आणून देहविक्रासाठी विकले. त्यामागे एक मोठे जाळे आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की त्याने कोणताही त्रास टाळण्यासाठी 75 मुलींशी लग्नही केले आहे. आरोपी मुलींना बांगलादेश आणि भारताच्या पोरस सीमेवरील नाल्यातून आणत असत आणि सीमेजवळील छोट्या गावात एजंटच्या माध्यमातून ते मुलींना भारतात आणण्यासाठी मुर्शिदाबाद आणि आसपासच्या ग्रामीण भागात आणायचे.

खरं तर, इंदूर पोलिसांनी 11 महिन्यांपूर्वी लासुडिया आणि विजय नगर भागात ऑपरेशन करून 21 बांगलादेशी मुलींची सुटका केली होती, ज्यात 11 बांगलादेशी मुली आणि बाकीच्या मुली होत्या. या प्रकरणात सागर उर्फ सांडो, आफरीन, अमरीन आणि इतरांना आरोपी बनवण्यात आले होते, मुनीर फरार झाला होता. त्याला सुरत येथून पकडण्यात आले तर गुरुवारी त्याला इंदूरला आणण्यात आले.

75 मुलींशी लग्न, 200 मुलींना बनवले कॉल गर्ल ; पोलिसांनी असा केला उलगडा
MI vs RR: आज जो हरला तो संपला!; मुंबई समोर राजस्थानचे आव्हान

बांगलादेशी मुलींना येथे आणण्यामागील माहितीनुसार, बांगलादेशचे एजंट गरीब कुटुंबातील मुलींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने गुप्तपणे सीमा ओलांडून कोलकात्याला आणायचे. येथे त्यांना आठवड्यापेक्षा जास्त काळ ठेवण्यात आले. देहबोली आणि उत्तम राहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ट्रेंड असताना मुलींना मुंबईला पाठवण्यात आले. येथे पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर शहरांमधून येणाऱ्या मागणीनुसार मुलींना उत्तर भारतीय शहरांमध्ये पाठवण्यात येत असे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com