

शहाड उड्डाणपुलाच्या कामामुळे कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प
वाहतूक शाखेच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त
शहरातील आपत्कालीन सेवांनाही मोठा फटका
शिवाजी चौक ते सिंडिकेटपर्यंतच्या परिसरात भीषण ट्रॅफिक जॅम
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण : शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहतूक शाखेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शिवाजी चौक, वालधुनी, अशोकनगर, शिवाजी नगर, रामबाग आणि सिंडिकेट या परिसरात भीषण ट्राफिकची स्थिती निर्माण झाली आहे.
दररोज सकाळ-संध्याकाळच्या पीक अवरच्या वेळी तर परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. साधारण दहा ते पंधरा मिनिटांत पार होणारा रस्ता ओलांडण्यासाठी तब्बल ४५ मिनिटांपासून एक तासापर्यंत वेळ लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. बस, दुचाकी, चारचाकी, ऑटो–रिक्षा अशी सर्व वाहने कासवचालीने रेंगत असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांसह आपत्कालीन सेवांना बसला आहे. अनेक रुग्णवाहिका तासन्तास या कोंडीत अडकून राहिल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला.
वाहतूक नियंत्रणासाठी काही चौकांवर पोलिस कर्मचारी तैनात असले तरी भगवान मेडिकल चौकात पोलिसांचा अभाव स्पष्टपणे जाणवला. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि पर्यायी मार्गांची योग्य आखणी करण्यासाठी वाहतूक विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कल्याणकरांनी केली आहे.
कल्याणमध्ये वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याचं कारण काय?
शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालीये.
कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक ट्राफिक जाम?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.