Heatwave Warning: देशभरात वाढला तापमानाचा पारा, केंद्र सरकारची राज्यांना अ‍ॅडव्हायझरी; दिल्या महत्त्वाच्या सूचना

Weather Update in Marathi: देशात यावर्षी तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचीच दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे.
Heatwave Warning
Heatwave WarningSaam Tv News

Central Government News:

देशात यावर्षी तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचीच दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी मोठी बैठक घेतली.

यातआयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Heatwave Warning
Recruitment News: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; रेल्वेत 9144 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज कसा आणि केव्हा करायचा

बैठकीनंतर मनसुख मांडविया म्हणाले, “आयएमडीने या वर्षी एल निनोचा अंदाज वर्तवला आहे आणि त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता जास्त आहे. आयएमडीने म्हटले आहे की, या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. ते म्हणाले की, हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे आणि उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात टाळण्यासाठी मी, आयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह तपशीलवार आढावा घेतला आहे आणि केंद्राला राज्य सरकारांना अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.''  (Latest Marathi News)

Heatwave Warning
Rahul Gandhi: राहुल गांधींनी वायनाडमधून दाखल केला उमेदवारी अर्ज; मात्र यंदा जिंकणं आहे अवघड, का? ते जाणून घ्या

हवामान विभागाने मंगळवारी दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये 6 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत दक्षिण बंगालमधील जिल्ह्यांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल ते जून या काळात देशभरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, ज्याचा मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय भागांवर गंभीर परिणाम होईल.

केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्यात जेवढे तापमान दिसून येते त्यापेक्षा यंदाचे तापमान जास्त असेल. या पार्श्वभूमीवर जनतेला विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ते म्हणाले की, यंदा तुम्ही निवडणूक प्रचारासाठी जाल तेव्हा पिण्याचे पाणी ठेवा आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा. लोकांनी वेळोवेळी पिण्याच्या पाण्यासोबत ज्यूसचे सेवन करावे. याशिवाय लिंबू पाणी प्यावे. उन्हाळ्यात मिळणारी फळेही खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com