Politics : इंडिया आघाडीला दुहेरी धक्का, २ बड्या नेत्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

Political News : बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी इंडिया आघाडीला दुहेरी धक्का बसला आहे. आघाडीतील दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे.
Politics
Politicsx
Published On
Summary
  • बिहार विधानसभा निवडणुकांआधी इंडिया आघाडीला धक्के

  • इंडिया आघाडीतील दोन बड्या नेत्यांनी दिला राजीनामा

  • भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची शक्यता

Bihar Politics : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर २०२५ मध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वा बिहारमध्ये इंडिया आघाडीला दुहेरी धक्का बसला आहे. आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) या दोन मित्रपक्षातील प्रत्येकी दोन आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हे दोन्ही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

महाआघाडी सरकारमधील माजी मंत्री मुरारी प्रसाद गौतम यांनी सभापती नंद किशोर यादव यांच्याकडे राजीनामा सादर केला. गौतम यांच्यावर यापूर्वी जनता दल (संयुक्त) (जेडीयू) सोबत संगनमत केल्याचा आरोप होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. सभापतींनी निर्णय देण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. मुरारी प्रसाद गौतम हे दिवंगत माजी मुख्यमंत्री महेंद्र राम यांचे पुत्र आहेत. ते प्रभावशाली स्थानिक नेते आहेत.

Politics
Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

मुरारी प्रसाद यांच्या राजीनाम्यानंतर राजद आमदार भरत बिंद यांनीही राजीनामा दिला. २०२० मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आगामी निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दोन नेत्यांनी लागोपाठ राजीनामा दिल्याने इंडिया आघाडीला दुहेरी धक्के बसल्याचे म्हटले जात आहे.

Politics
Aanandi Joshi : तिचं क्लिव्हेज किती डिप... मराठी गायिकेला पुण्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह मेसेज; नाव अन् पत्ता शोधून...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. विधानसभा निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये पार पाडल्या जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान ६ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे ११ नोव्हेंबर रोजी पार पाडले जाईल. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल लागेल.

Politics
Nashik : भाजप नेत्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, आरपीआय नेत्याला अटक; नाशिकमध्ये पोलीस ॲक्शन मोडवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com