
निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मोठा फटका बसला.
३ आमदार, १ माजी खासदार आणि अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केला.
समारंभात राजकीय नेते भारतीय जनता पक्षात सामील झाले.
Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वा बिहारमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आरजेडी, काँग्रेसमधील तीन आमदार, एक माजी खासदारांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पटना येथे आयोजित करण्यात आलेल्या पुनर्मिलन समारंभात अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये सामील झाले. संगीता कुमारी, सिद्धार्थ सिंह हे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमधील आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याशिवाय माजी खासदार सुनील कुमार पिंटू आणि मुख्य आयकर आयुक्त सुजित कुमार हे सुद्धा भाजपमध्ये सामील झाले.
पटना येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सर्व नेते पक्षात सामील झाले. या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढल्याचे म्हटले जात आहे. हा राजद, काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसऱ्या बाजूला भाजपची ताकद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाद्वारे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. विधानसभा निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये पार पाडल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडेल. मतदानाचा निकाल हा १४ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.