Arvind Kejriwal: ...तर पुढील लक्ष्य पश्चिम बंगाल आणि केरळचे मुख्यमंत्री असते; CM अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य

arvind kejriwal on political : मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला.
...तर पुढील लक्ष्य पश्चिम बंगाल आणि केरळचे मुख्यमंत्री असते; CM अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य
Arvind Kejriwal Google

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. 'मुख्यमंत्री पद सोडलं असतं तर पुढील लक्ष्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन असतील, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी 'आज तक'शी बोलताना केला आहे.

पंतप्रधान मोदी नाही तर अमित शहा हे पंतप्रधान होतील, या वक्तव्याबाबत केजरीवाल म्हणाले,'तुम्ही इंटरनेट सर्च करा. अमित शहा यांनी २०१९ साली म्हटलं होतं की, ७५ वर्षांच्या लोकांना निवृत्त करत आहेत. याच प्रकारे अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांना निवृत्त करण्यात आलं.

...तर पुढील लक्ष्य पश्चिम बंगाल आणि केरळचे मुख्यमंत्री असते; CM अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य
Azam Khan: आझम खान यांना ७ वर्षांचा कारावास; निवृत्त सीओसह ३ दोषींना ५ वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

'शिवराज, वसुंधरा, खट्टर या सर्वांना हटविण्यात आलं. योगी यांनाही हटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारण अमित शहा यांना मार्ग सोपा होईल. भाजपच्या लोकांनीही योगी यांना हटविण्याबाबतचे आरोप फेटाळले नाहीत, असे ते म्हणाले.

...तर पुढील लक्ष्य पश्चिम बंगाल आणि केरळचे मुख्यमंत्री असते; CM अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य
Dombivli MIDC Blast Case: डोंबिवली MIDC दुर्घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक, सरकारवर केला गंभीर आरोप

राबडी देवीच्या मॉडेलच्या प्रश्नावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले,'मी देवाचे आभार मानतो. माझ्या सारख्या रागीट व्यक्तीला बायको सुनिताने साथ दिली. मी अचानक आयकर विभागातील कामाचा राजीनामा दिला होता. ती राजकीयरित्या सक्रिय नाही. ती निवडणुका लढणार नाही. मी तुरुंगात असेल, तुरुंगातूनही निवडणूक लढवेन. मी दिल्लीतील ७० पैकी ७० जागा जिंकेल'.

केजरीवाल यांनी दावा केला आहे की, 'भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. पंतप्रधान मोदी हे अमित शहा यांना बनवू इच्छित आहे. मात्र, बाकीचे नेते तयार नाहीत. पंतप्रधानांनी वयाबाबतचा नियम स्वत: साठी तयार केला नसल्याचं कुठेही म्हटलं नाही. पंतप्रधान मोदी यांनी कुठेही नियम स्वत:साठी बनवल्याचं बोललं नाही. लोकांना सर्व माहीत आहे. योगींना हटविण्यात येणार आहे, याबाबत देशभरात दबक्या आवाजात सर्वत्र चर्चा सुरु आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com